प्रथम तो तीला एका पार्टीमधे भेटला, ती ईतकी सुंदर दिसत होती की खुपजण तिच्यासोबत जवळीक साधायचा प्रयन्त करत होते, तो मात्र शांत होता. कुणाचेच त्याच्याकडे लक्ष नव्हते. पार्टी संपत आली होती आणि त्याने तिला त्याच्या सोबत कॉफी पिण्यासाठी आमंत्रीत केले. प्रथम तिला आश्चर्य वाटले, पण त्याने सभ्यपणाने विचारले असल्याने तिनेही येण्याचे अश्वासन दिले. ते एका छानश्या कॉफी शॉप मधे बसले, पण त्याला काय बोलावे हेच सुचत नव्हते. तिला देखिल बोअर व्हायला लागले होते, विचार केला लगेच घरी निघून जावे. अचानक त्याने वेटरला विचारले, क्रुपया मला थोडेसे मिठ मिळेल का? मला कॉफीसोबत हवेय. हॉटेलमधे असलेला प्रत्येकजण त्याच्याकडे बघायला लागला होता, काय विचीत्रपणा! त्याला देखिल कसेतरीच वाटले, पण तरिही त्याने स्वःताच्या कॉफीमधे मिठ टाकून ते पिऊन टाकले.
तिने त्याला कुतूहलाने विचारले: तुला, असा हा छदं का आहे?
त्याने ऊत्तर दिले: जेव्हा मी लहान होतो, मी समुद्र किनारी रहायचो, मला समुद्रात खेळायला आवडायचे. मला आता देखिल तो अनुभव मिळतो, खारटसा, ......... मिठ टाकलेल्या कॉफीसारखा. आता जेव्हा कधी मी खारट कॉफी पितो, मला माझे बालपण आठवते, माझे लहनपणीचे घर आठवते. मी त्यानां खुप miss करतो. मी माझ्या आईवडलांना miss करतो, जे अजुनही तेथेच राहतात. हे बोलताना त्याच्या डोळ्यात आसवे उभी राहिली होती.
तिच्या मनाला हे खुपच खोलवर परिणाम घडवून गेले. त्या त्याच्या खय्रा भावना होत्या, ह्र्दयाच्या खोलातुन आलेल्या. असा व्यक्ती जो आपल्या घराबद्दल असे विचार असतील, त्याला नक्कीच घराबद्दल काळजी असेल, ईतरांबद्दल काळजी असेल. त्यानंतर तिनेही बोलायची सुरवात केली, तिच्या दुर असलेल्या घराबद्दल, तिच्या बालपणाबद्दल, तिच्या Parents बद्दल.
त्यांची बातचीत खुपच छान झाली, त्याच बरोबर त्याच्यां कथेची सुरवात देखील.
त्यानतंर त्यानी वारंवार भेटणे चालूच ठेवले. त्याच्याप्रमाणे तिला देखिल तिच्या स्वप्नातला राजकुमार भेटला होता. सर्वच बाबतीत तो तिला सुट होत होता...... एक असा व्यक्ती ज्याला ती कधीपासूनच शोधत होती.! Thanks to his salty coffee!
त्यानतंर त्याचीं कथा प्रत्येक परीकथां प्रमाणेच झाली. राजकुमाराने राजकन्येशी लग्न केले, आणि ते सुखी झाले.... आणि, जेव्हा कधी ती त्याच्यासाठी कॉफी बनवत असे, त्यामधे थोडेसे मिठ टाकत असे.... कारण त्याला आवडते.
चाळीस वर्षानतंर, तो तिला सोडून गेला, कायमचाच. तिच्यासाठी एक पत्र लिहून ज्यामधे लिहले होते: प्रिये, क्रुपया मला माफ कर, माझ्या जिवनभरातल्या एका खोटेपणासाठी. तुझ्याशी मी फक्त एकदाच खोटे बोललो.... खारट कॉफी. आठवतेय.
आपण प्रथम भेटलो होतो. मी त्यावेळेस इतका nervous झालो होतो, खरतर मला साखर हवी होती.
पण मी मिठ मागीतले. त्यानंतर मला ते नाकारणे खुपच कठीण वाटले, त्यामुळे मी ती कॉफी पिऊन टाकली. मला कधीच असे वाटले नाही की, ती आपल्या नात्याची सुरवात असेल. मी तुला खरं सांगण्याचा खुपदा प्रयत्न केला, पण नाही सांगु शकलो, मी तुला वचन दिले होते, तुला कधीच फसवणार नाही.... आता मी मरत आहे. मला आता कशाचीच भिती वाटत नाही, म्हणुन तुला खरं सागंतो आहे. मला कधीच खारट कॉफी आवडली नाही. खुपच खराब चव असते..... पण तु माझ्या जिवनात आल्या पासुन मी खारट कॉफी पित आहे. तु माझ्या सोबत आहेस हिच माझ्या जिवनातली सर्वात आनंदाची गोष्ट आहे.
जर मला पुन्हा जिवन लाभले, तरी मला तुच हवी असशील, जरी त्यासाठी मला पुन्हा खारट कॉफी प्यावी लागली तरी.
.......तिच्या अश्रुनीं ते पत्र पुर्णपणे भिजले होते.
एकेदीवशी, कुणीतरी तिला विचारले: खारट कॉफी कशी असते?
‘गोड’..... तिने ऊत्तर दिले.
1 टिप्पणी:
Nice!
टिप्पणी पोस्ट करा